रत्नागिरी तालुक्यातील हातीस, टेम्भे ग्रामकृती दलाची संकल्पना; परंपरा खंडित होणे टळणार
प्रतिनिधी/रत्नागिरी
चाकरमानी येऊ शकले नाहीत तरी त्यांच्या घरी गणपती उत्सव साजरा होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना राबविली आहे.
यंदा इच्छा असूनही अनेक चाकरमानी आपल्या गावी येऊ शकले नाहीत कोकणातील प्रत्येक गावात आपल्या घरी गणेश चतुर्थीला घरात गणपती बसवून पूजाअर्चा करण्याची परंपरा आहे. काही चाकरमानी येऊ न शकल्याने ही परंपरा खंडित होणार की काय अशी चिंता निर्माण झाली होती. ती कोरोनातील टाळेबंदीमुळे खंडित होऊ नये यासाठी हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना राबविली आहे.
मुंबईतून येणे शक्य नसलेल्या चाकरमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याची जबाबदारी वाडी कृतिदलाने स्वीकारली असून त्यावर होणारा खर्च मुंबईतून चाकरमानी पाठवून देणार आहेत. ही संकल्पना आदर्शवत असून मुंबईकर चाकरमान्यांची गावाकडील घरी गणपती आणण्याची इच्छापूर्ती करणेही शक्य होणार आहे. गावातील घरात गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी वाडी कृतिदल घ्यायला तयार आहे, असे आवाहन मुंबईकर चाकरमान्यांना केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही लोकांनी तयारी दर्शवली आहे. सरपंच कांचन नागवेकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









