ऑनलाईन टीम / मुंबई :
बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याचे काल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी पडत असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जाऊ शकतात.
दरम्यान, काल संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला होता. तसेच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी यावेळी.. केली होती.








