ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 9509 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 260 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एका दिवसात 9926 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 76 हजार 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.74 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 269 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 15 हजार 576 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.53 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 9 लाख 25 हजार 269 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 944 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









