बेळगाव : मधमाशांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना नावगे गावच्या शिवारात घडली आहे. नावगे गावात सकाळच्या सत्रात चारा आणण्यासाठी एक युवक गेला असता मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला. सागर पाटील (वय 27, रा. नावगे) असे या युवकाचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी घडली. या हल्ल्यात तो जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी या मधमाशांनी शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या बेळवट्टी गावच्या पाच शेतकऱयांवर हल्ला केला. विठ्ठल रामलिंग नलवडे (वय 42), लक्ष्मण चिरमुडकर (वय 35), परशु सुतार, नामदेव पाटील आणि मारुती चौगुले यांच्यावर हल्ला केला. यात विठ्ठल नलवडे आणि लक्ष्मण चिरमुडकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य तिघा जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मधमाशांकडून वारंवार होण्याऱया हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Articleकुरिहाळ प्राथमिक मराठी शाळेचा कायापालट
Next Article विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









