पंजाबमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद संपलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत पक्षाने अत्यंत निस्तेज आणि निर्जीव प्रचार केला आहे असा आरोप काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यांचा रोख दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये यावेळी काँग्रेसला आम आदमी पक्षाची जोरदार चुरस होत आहे. अशावेळी पक्षाने अधिक आक्रमकपणे प्रचार करावयास हवा होता असे सिद्धू गटाचे म्हणणे आहे. अमृतसरचे खासदार गुरुजितसिंग औजला यांनी सिद्धूंवर पटलवार करताना त्यांनीच मनापासून प्रचार केला नाही. ते स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यात गुंग होते असा प्रत्यारोप केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद अद्यापही संपलेले नाहीत ही बाब स्पष्ट होत आहे.
Previous Articleयोगींकडून अयोध्येत व्यापाऱ्यांमध्ये प्रचार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









