बार्शी / प्रतिनिधी :
बार्शी तालुक्यातील कव्हे या ठिकाणी विजेचा धक्का लागून आज एका अल्पवयीन बालकाचा निष्पाप बळी गेला आहे. बार्शी शहरापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये मयत प्रणव लक्ष्मण सुरवसे ( वय वर्ष 14) हा आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या तुटलेल्या तारे जवळ तो गेला. तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श तारेशी झाल्याने आणि ती विजेची तार हाय करंटची असल्याने अगदी जोराचा विजेचा झटका त्यास लागला. हा विजेचा झटका तीव्र असल्याने या बालकाचा जागेवरच मृत्यू झाला. अशी नोंद बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे झाली आहे. या गावामध्ये विजेच्या धक्क्याने बळी गेलेली ही दुसरी घटना असून याचवर्षी अजून एक व्यक्ती मृत्यमुखी पडली होती. गावातील डीपीच्या जवळ तुटलेल्या तारेला शॉक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे समजले आहे. केवळ महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एकाच गावातील दोन जणांचा निष्पाप बळी गेला असून याबाबत कव्हे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleशेतकऱयाचे ‘वांदे’
Next Article बारामती शहरातील वीजपुरवठा गुरुवारी काही काळासाठी बंद









