सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक : आप्पाचीवाडी-कुर्ली यात्रेसाठी स्थानिक भाविकांची उपस्थिती
: मंदिर परिसरात भंडाऱयाची उधळण : पालखी मिरवणूक चीन देश भारतावर हल्ला करंल, चालल राज्य गुंडांच चालल, अतिरेकी लोक येतील मो”ा घोटाळा करून जातील, बॉम्बस्फोट होतील, दिल्लीच्या गादीला मो”ा धोका व्हईलं, शहरालागून असलेली शहरं खेडय़ाप्रमाणे होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालवून जाईल, अ”रा तऱहंच माणसाला आजार होतील, आडं चुकंल पण खेडं चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, बारा कोसाला एक दिवा लागल, माणसाची वसती विरळ होईल. वादळ, भूकंपानं समुद्राची उलथापालथ होईल. अल्लम दुनियेचा चवथाई कोना वसाड पडल. कोरोना किती बी वाढला तरी त्याला पायाखाली घेईन, पण लक्षात घ्या, जपून ऱहावा, पृथ्वीचा करार संपत आलाय, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली. कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथांच्या अश्विन यात्रेला 31 रोजी उत्साहात सुरुवात झाली. यंदा पहिल्यांदाच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यात्रा उत्सव केवळ स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करत पार पडला. नाथांची पहिली भाकणूक 3 रोजी पहाटे झाली. तर मुख्य भाकणूक 4 रोजी पहाटे झाली. सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या दरबारात येत्या काळातील होणाऱया बदलांचे भाकीत कथन केले. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, देश-विदेश, अतिरेकी, हवामान, नैसर्गिक आपत्ती याबद्दल भाकीत केले. त्या भाकणुकीचा हा घोषवारा….

महेश शिंपुकडे निपाणी
मेघयान मळा माझ्या आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा. हाय मेघ उदंड हाय, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाया, लागलाय त्यो दुनिया न्याहाळू लागलाय. त्याच्या म्हागं अंधार, म्होरं अंधार पडलाया. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, नऊ दिन नम सात दिन भोंब बरोबर हाय. भोंबच्या पुनवेला वाडीकुर्लीच्या खडकाच्या माळाला झेंडा मिरवंल, भोंबेच्या पुनवेला माझा सोहळा निघतोया, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोया. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला भाषण चाललंया, वाडीकुर्लीच्या खडकाचे माळाला फार पूर्वी काळाला आशान टाकलया, निशाण रोवलया.
अगा येगा बाबा, डोण्या तू प्रधाना, अगा येगा बाबा धरतो हेगडी प्रधाना, जळा यान स्थळा, माझ्या पूर्वीच्या हेल्लाळा, जोती यान जोती डोंगराचा बालपणाचा सोबती, काढावी पोती काढावं काढावं पोती पुराण काढावं, वाचून दावावं सभेत बोलावं, खोटं तू बोलशील खरं मी करीन, शब्दा सादर राहीन, पेरल ते उगवल. शेवटाला लावीन, चालविन क्रिया चालविन डोण्याच्या बाळाची क्रिया चालविन, वस घडविन. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय हाय, आप्पाचीवाडी-कुर्ली भूमीचा महिमा अगाध हाय, जगात झेंडा मिरवल, भोगीच्या पुनवेला माझा सोहळा निघतोय, शेजारच्या बनात खेळायला जातोय.
हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र हाय
खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरलाया. कांबळय़ाच्या खोळत मी फुले माळंत बसलोया. पृथ्वीची घडामोड करत बसलोया, आप्पाचीवाडी तिर्थक्षेत्र प्रति शिर्डी क्हईल. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी, वाडीकुर्ली आगार इथं नाथाचा भरलाय नाथांचा दरबार. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, महिमा जगात वाढत राहील. वाडीकुर्लीच्या पुजारी, मानकऱयासनी माझा आशीर्वाद हाय, वाडीकुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला.
खांद्यावर चाबूक, हातात भाकरी
हाय धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱयातील राघू भाषण करंल, चित देवाच, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारील. तिसरा मोगरा राज्य करील, तुमी बगाल आश्विनी, भरणी, कात्या, वॅढतिका, रोहिणी मृगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग मिरवेल कुरी, मिरवेल कोकण बंधारी मिरवेल. बांधा आड बांध, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधंल तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक, साधंल तो सोबती.
कडधान्य उदंड पिकंल
सरता मृग निघता आडद्रा मध्यम फाटय़ाचा पेरा होईल. सरता आडद्रा निघता तरणा, अल्लम दुनियेचा पेरा होईल, कुरी धाऱयाला बसंल, रोहिणीची पेरणी त्याला हादक्याची पुरवणी क्हईल. देवधान्य बहुता उदंड पिकंल, राज धान उदंड पिकंल. धारण धुरणं जगाचे जगवनं. खळय़ाचे का”ाr 3 मापटी म्हणतील, 3 मापटी म्हणता शेरावर येईल. चढंल उतरंल, शेर म्हणता मापटय़ा चिपटय़ावर येईल. खरीप भोरीप बहुत उदंड पिकंल, जमिनीतलं धान्य बहुत बेमानं राहील, तांबडी रास मध्यम पिकंल, मोलानं विकंल, काळी रास सुफळ जाईल, कडधान्य उदंड पिकंल.
घरी धान्य तोच शहाणा
सर्वसामान्य माणूस खात राहील. दीड महिन्याचं धान्य पिकंल. पांढरी रास उदंड पिकंल, गोरगरीबाला पुरावा करील, तांबडी कळी मध्यम पिकंल. ती ताजव्यातून जोकल, कागदातून विकंल, धान्य दारात, वैरण कोन्यात, वैरण सोन्याची होईल, संभाळून ऱहावा, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, धान्या दुनियाची वैरण काडीची चोरी मारी वाढत राहील. कानानं ऐकाल, डोळय़ानं बघत राहशीला, सांभाळून ऱहावा. गक्हाची पेंडी मध्यम पिकंल. पिकंल ती बांध आड बांध शिवा आड शिव पिकंल.
कपडा, लत्ता फुकाचा होईल
12 वर्षाची मुलगी आई होईल, कानानं ऐकाल, डोळय़ानं बघशीला, उगावत्या सूर्याला संकट पडलया, भूमिमाता दुभंगून जाईल, भूमिमातेतून भोंग निघतील.
कोरोना संसर्गाचे भाकीत खरे ठरले
आप्पाचीवाडी येथे होणाऱया हालसिद्धनाथ भाकणुकीतील अनेक भाकिते खरी ठरली आहेत. उसाची आंदोलने पेटतील, दूध रस्त्यावर ओतलं जाईल, दिल्लीवर भगवा राज्य करेल, उन्हाळय़ाचा पावसाळा होईल, अशी याची अनेक उदाहरणे आहेत. याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून जाळ-ताप, किरम-खोकला आजार वाढतील, अठरा तऱहेचे आजार माणसाला जडतील, डॉक्टर लोक हात टेकतील, माणसे मुसक्या बांधून फिरतील, असे भाकीतही केले जायचे. कोरोनाच्या संसर्गामुळे हे भाकीतदेखील खरे ठरल्याची चर्चा भाविकांतून केली जात आहे.
मेंढीबाई पालखीतून मिरवंल
सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल, जग दुनियेत मो”ं एक नवंल होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, होईल त्याची किर्ती होईल. आहे म्होरंच भविष्य आहे. मेंढीच्या मेंडक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माउली मेंडक्याची सुखाची सावली होईल. मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी होईल. मेंढीबाईला कलम जडंल, मेंढीपासून वेगळी पैदास होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. मेंढीबाई पालकीतून मिरवंल, धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मि”ाr मारंल. कळपातला बकरा कळपात लढंल, फुटेल मुढा फुटेल, कालवेल दुनिया कालवेल, कालवून जाईल, मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही. गाईचं वासरु गायीला भेटणार नाही. पडेल जग दुनियेत अंधार पडंल.
साखर, तंबाखूचा भाव गगणाला भिडंल
शुगर पॅक्टरीचा मालक आनंदात राहील, साखरेचा भाव काही दिवस तेजीत राहील, साखरेचं पोतं तेजी-मंदीत राहील, गुळाचा भाव वाढत राहील, साखरंचं पोतं मोलानं इकल, मांडवाचे दारी 2600 म्हणतील, 2600 म्हणता 2500 वर येईल. 2500 म्हणता 2400 वर येईल 2400 म्हणता 2300 येईल, चढल, उतरंल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकंल. तंबाखूचा भाव गगनाला भिडंल, तंबाखूपासून तरुणपिढी, घरदार बरबाद होतील. माणसाला आजार लागंल, रस भांड उदंड पिकंल, रसाला धारण माणसाला मरण येईल, उसाचा काऊस होईल, सडकवर पडंल, औषधाला मिळणार नाही, उसासा”ाr देशात, राज्यात आंदोलन छेडतील, गावोगावीöखेडोपाडी दंगा धोपा होईल, जाळपोळ होईल.
महिला राजकारणात बाजी मारतील
नऊ वर्षाची मुलगी भरतार मागंल, दागिने-पैसे माणसाला घातक “रतील, घरातून गेलेला माणूस परत येईल म्हणून आशा धरू नकोसा, तांबडं धान्य मोलानं विकेल, सोनं काही वर्षानं फुकाचं होईल, चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मो” बिघोड लागेल, राजकारणात सट्टाबाजार चाललाया, राजकीय नेते सत्तासंपत्ती गोळा करतील, देशाचा बाजार मांडतील, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटय़ा उडय़ा मारतील. तोंडघशी पडतील. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. स्त्री वर्ग राजकारणात मो”ाr बाजी मारेल, राजकीय नेत्यांची खुर्ची काढून घेतील, नोकर वर्ग समाज खाईल, बारा महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागंल. पंच लोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर माणसाला न्याय मिळणार नाही. खऱयाचं खोट आणि खोटय़ाचं खरं करतील, होतील भुकंप होतील, कृष्णेच्या काठाला बांगडय़ा फुटतील, फुटतील 9 लाख, व्हावतील रक्ताचे पाट व्हावतील.
समुद्रातील संपत्ती नाश पावेल
बैलाची किंमत बकऱयाला येईल, बकऱयाची किंमत कोंबडय़ाला येईल, कोंबडं माणसाच्या पाठी लागंल. माशापासून माणसाला आजार होतील. बारा वर्षाचं बालपण खेळतं राहील, चोवीस वर्षाचं तरुणपण काबाडकष्ट करील, पस्तीस वर्षातच म्हातारपण येईल. माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील. एका पुरुषाला सात बायका होतील, पुरुष झाडाच्या शेंडय़ावर चढून बसंल. नवऱयाला बायको थोबाडीत मारील, माळाची नदी, नदीचा माळ होईल, नदीबाईला कुलपं पडल्यात. नावबाईपाशी सतपण हाय, इजबाईचा मोठ्ठा कल्लाटा होईल, इजबाईनं मोठ्ठ नुकसान होईल, डोंगरपर्वत वाफेने जातील, समुद्रातील संपत्ती नाश पावेलं. स्मगलर लोकांची हत्या होईल. नाचतील हिजडं नाचतील.
बसव्याचं शिंगाट सोन्याच व्हईलं
घरातील लक्ष्मी दडून बसलीया, रानातील लक्ष्मी पळून खेळतीया, कोकण्यातील बसक्या सरहद्दीवर येईल, देशातील बसक्या सरहद्दीवर येईल. सरहद्दीवर दोघांची टक्कर लागेलं. शेतासा”ाr देशात खून पडतील, कागदाचा घोडा माणसाला खूळ लावंल, काळी कांडी पोटाशी धन जतन करावी, एक औत चौघात होईल, बारा बैलाचा तिवडा रोवलाया, मदनातला बैल उफराटा फिराया लागलाया, बसक्याचं शिंगाट सोन्याचं होईल. बसक्या राजाची तुमी सेवा करावी, कुळंब्याच्या बाळाला विचार पडलाया, जग दुनियेत तीन राजे हायेत, एक राजा मेघराजा, दुसरा राजा बसक्याराजा, तिसरा राजा कुळंबीराजा, कुळंब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय.
साताऱयाच्या गादीवर फुलं पडतील
मेघराजाची तुम्ही वाट बघत राहशीला, उन्हाळय़ाचा पावसाळा, पावसाळय़ाचा उन्हाळा होईल, धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल. काळय़ा खडकाच्या लाहय़ा उडतील, खडकाच्या माळाला तुम्ही धडका खाशीला, कोल्हापूरच्या देवीला मो”ं संकट पडलंय, रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतया, परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करतील, साताऱयाच्या गादीवर फुलं पडतील, हाय ही भाकरीवरची भाजी हाय, संभाळून खावा.
गर्वाच घर खाली हाय
शिवाजी महाराजांचा जयजयकार करा, शिवाजी महाराज कोणाच्यातरी पोटी जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करील. सभेतून मिरवेलं, एक तारणार कळप मारणार, कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं खाणार, हालसिद्धनाथांची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी, थराचा धोंडा थराला बसंल, नऊ पृथ्वी दहा खंड काशी बरोबर हाय, दहाक्या काशीत माझं दप्तर हाय, करवीर काशीत माझा “िकाण हाय, आहे ही गोसाक्याची पांढर आहे, गोसाक्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं, वागू नये गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय.
वाडीकुर्लीच्या बाळांनो एकीने वागा
मी थोरला तू थोरला म्हणू नकोसा, लहानाचा मो”ा, मोठय़ाचा लहान होईल, हाय की हाय हा विषाचा पेला हाय हय़ो खैराचा इंगोळ आहे, वाडीकुर्लीच्या बाळांनो एकीने वागा. करशीला सेवा तर खाशीला मेवा, तुमचे दु:ख माझ्या पायाशी घेऊन, माझ्या झोळीतली रिद्धीसिद्धीr तुम्हाला देईन, पोटाशी धरीन, जतन करीन, करीन पांढरीची राखण करीन.









