ऑनलाईन टीम / पालघर :
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 11 वाजून 57 मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती. अजून तरी या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली असल्याचे समोर आलेले नाही. दरम्यान, लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.








