पुन्हा पेव्हर्स बसविण्याची मागणी प्रतिनिधी बेळगाव पहिले रेल्वेगेट येथील रुळानजीक महिन्याभरापूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले होते. परंतु हे पेव्हर्स चांगल्या पद्धतीने बसविण्यात आलेले नसल्याने काही दिवसांमध्येच निखळले आहेत. निखळलेले पेव्हर्स वाहनचालकांसाठी डोकेदुखीचे ठरत असून ते पुन्हा बसविण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. रेल्वे विभागाने पहिल्या रेल्वेगेटच्या दुरुस्तीनंतर मोठी खडी टाकली होती. यामुळे दुचाकी वाहनांना ये-जा करणे कठीण झाले होते. खडीवरून पडून अपघातांचे प्रमाणही वाढत होते. यासाठी या ठिकाणी पेव्हर्स बसविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अखेर महिन्याभरापूर्वी या ठिकाणी पेव्हर्स बसविण्यात आले. पेव्हर्स बसविताना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले गेले नसल्याची तक्रारी वाहनचालक करीत आहेत. त्यामुळेच काही दिवसांमध्येच ते पेव्हर्स निखळले आहेत. पेव्हर्स निखळून रस्त्यावर पडले असल्याने रात्रीच्या वेळी दृष्टीस न पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पेव्हर्स बसविण्याची मागणी होत आहे.
Previous Articleपत्रकाराने निर्भयपणे लेखणी चालवावी
Next Article होम मिनिस्टरमध्ये सन्मान माहेरवाशिणींचा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









