तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
दिल्लीमध्ये झालेल्या तबलीकी इस्तेमा कार्यक्रमानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. ह्या कार्यक्रमात बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथील आठ जण सहभागी झाले होते. दरम्यान ह्यांची वैद्यकीय तपासणी करण्याविषयी ग्रामसेवकाला सूचना देणाऱ्या इसमासह त्याच्या पत्नी व मुलांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत वैराग पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जग हैराण झाले आहे. भारतात ही गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पाय पसरू लागला आहे. कोरोनाचा प्रकोप झालेल्या दिल्लीतील ( निजामुद्दीन दर्गा ) इस्तेमामध्ये बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथील आठ लोक सहभागी झाले होते. या लोकांची माहिती स्थानिक ग्रामसेवक नितीन वाघमारे यांना दिल्यामुळे एका वृद्धाला मारहाण केली.
बहादूर
साहेबलाल पठाण ( वय
68) असे मारहाण झालेल्या
वृध्दाचे नाव आहे. याबाबत
बहादूर पठाण यांच्या फिर्यादीवरुन
बंदीनवाज रमू शेख, फिरोज
बंदी नवाज शेख, तुराब
आप्पा सय्यद, जावेद
तुराब सय्यद, बाशाभाई
नबीलाल पठाण, रज्जाक
बाशाभाई पठाण, इसाक
उस्मान पठाण अशा सात जणांच्या
विरोधात वैराग पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
दरम्यान अन्य
एकाची तपासणी करण्यासाठी
त्यांना सोलापूरला पाठवण्यात
आले आहे. त्याचा
अहवाल तीन दिवसात प्राप्त
होणार आहे. उपळे
प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत
येणाऱ्या जामगाव उपकेंद्रात
पिंपरी (आर) हे
गाव येते. ह्या
गावातून हे आठ जण दिल्लीला
पाच मार्च रोजी जाऊन बारा
मार्च रोजी परत आले. तेव्हापासून
एकवीस दिवसांत त्यांचे ६३
जणांशी संपर्क आला. ह्यांची
दोन ते तीन वेळी यापूर्वीच
तपासणी करण्यात आली असून
कोणालाही कोरोनाची लक्षणे
आढळलेली नाहीत. विशेष
म्हणजे सोलापूरला तपासणीसाठी
पाठवलेल्यांनाही अद्याप
लक्षणे आढळून आलेली नाहीत.
या इस्तेमामध्ये
सहभागी झालेल्यांपैकी हे सात
जण जाऊन आल्याची माहिती समोर
आली आहे. दिल्लीतील
या मेळाव्यात देशातील अनेक
राज्यातून लोक आले होते.
आपत्ती व्यवस्थापन
कायद्याचा भंग करुन आणि सोशल
डिस्टन्सिंगचे पालन न करता
हा मेळावा पार पडला. मेळाव्यात
आलेले तेलंगणा राज्यातील 6
लोक कोरोनामुळे
मृत्यूमुखी पडले आहेत.
साहजिकच या मेळाव्यातून
आलेल्या लोकांची वैद्यकीय
तपासणी झाली आहे का? अशी
विचारणा बहाद्दूर पठाण यांनी
ग्रामसेवक नितीन वाघमारे
यांना केली होती.
त्यावरुन
ग्रामसेवकांने लागलीच या सात
जणांना वैद्यकीय तपासणीस
उपस्थित राहण्याचा आदेश
बजावला. त्यावर
त्यांनी ही माहिती कोणी दिली?
अशी विचारणा ग्रामसेवकाकडे
केली. ग्रामसेवकाने
बहाद्दूर पठाण यांचे नाव
सांगितल्यानंतर या 7 जणांनी
फिर्यादीच्या घरासमोर येवुन
तु गावातील ग्रामसेवक यांच्याकडे
आमचे वैद्यकीय तपासणीबाबत
का चौकशी केली? याचा
राग मनात धरुन फिर्यादी,
त्याची पत्नी चांदबी
बहादुर पठाण, मुलगा
बिलाल बहादुर पठाण, मुलगी
तबु व नसरीन यांना शिवीगाळी
करुन लाथाबुक्क्याने व हातातील
लाकडी काठीने मारहाण करुन
जखमी केले.








