ऑनलाईन टीम
देशात अशी नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशबांधवांना केलं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. यामध्ये मोदींनी कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केलं. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलनावरून मोदींनी विरोधकांकडून होत असणाऱ्या टीकेचाही या भाषणात समाचार घेतला.
यावेळी मोदी म्हणाले, “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं” असे ते म्हणाले.
हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. त्यामुळे देशानं अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवं. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, अशा शब्दांत मोदींनी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांना सुनावले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









