प्रतिनिधी / जत
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दुध दर वाढीसाठी गेल्या महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता परंतु अद्याप शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने राष्ट्रीय समाज पक्ष जत तालुक्याच्या वतीने जत तहसिल कार्यालय येथे रासपच्या वतीने विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून सरकारला सद्बुद्धी दे जागे कर म्हणून साकडं घालीत, सरकारचा निषेध व्यक्त केला.
गेल्या ४ महिन्यात दुधाचा दर ३४ वरून २० रुपयांवर आला आहे. पशुखाद्याचे दर मात्र कमी झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला पशुधन जगवण मुश्कील झाले आहे. त्यामुळे अडचणीत शेतकऱ्यांला दुधाला प्रतिलीटर ३५ रुपये भाव मिळाला पाहिजे. गेल्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यावर लिटरला ५ रुपये अनुदान जमा केले होते, तसे आत्ताच्या परिस्थितीत प्रति लिटर किमान १० रुपये अनुदान हे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावे, दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांना तात्काळ विशेष बजेट देण्यात यावे या मागणीसाठी विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून सरकारला सद्बुद्धी दे जागे कर आमच्या शेतकरी राजाच्या दुधाला रास्त भाव मिळू दे म्हणून साकडं घालीत सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी रासप नेते अजितकुमार पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, तालुकाध्यक्ष किसन टेंगले, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अकिल नगारजी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी, शहराध्यक्ष भूषण काळगी, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल पुजारी, सर्वोदय पतसंस्थेचे संचालक रामचंद्र मदने, धनाजी मोटे, दशरथ बंडगर, राजू कोळी, विष्णु सरगर यांच्या सहित रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleरिलायन्स-एचडीएफसीच्या कामगिरीने सेन्सेक्स तेजीत
Next Article वाढीव वीज बिलाविरोधात इरिगेशन फेडरेशन आक्रमक








