प्रतिनिधी / कोल्हापूर
वीज बिलाची वसुली करताना, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये, अशा सुचना महावितरण कंपनीला द्याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय बुडाले, अनेकांची नोकरी गेली. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. आर्थिक अडचणींवर मात करीत, जनजीवन पुर्वपदावर यावे यासाठी प्रयत्न करणाऱया नागरिकांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे.
लॉकडाऊच्या काळातील व्यावसायिक, औद्योगीक वीज ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करण्याचे व घरगुती वीज बिल माफ करण्याचे आपल्या महाविकास आघाडी सरकारने जाहिर केले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी वीज प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. तरी लॉकडाऊन काळातील औद्योगीक वीज ग्राहाकांचे स्थिर आकार रदद करणे व घरगुती वीज बिल माफ करण्याबाबतचा निर्णय होईपर्यत थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, याबाबतचे आदेश संबंधीत यंत्रणेला देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार जाधव यांनी निवेदनात केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









