ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगाव जिह्यात मागील 14 वर्षात 1679 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या असून, सन 2014 ते 2019 या पाच वर्षात 1025 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्याचे केले गेलेले दावे फोल ठरले आहेत.
राज्यात मागील 17 वर्षात 28963 शेतकऱयांनी तर जळगाव जिह्यात गेल्या 14 वर्षात 1679 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांचे प्रमाण हे सतत वाढते असल्याने शासनासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. जळगाव जिल्हयात देखील 2001 ते 2005 या कालावधीत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अगदी नगण्य होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या आणि ते लोण सर्वत्र पसरले. 2006 मध्ये जिह्यात 88 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. 2013 पर्यंत ही संख्या दोन आकडी राहिली. त्यानंतर 2014 मध्ये 174, 2015 मध्ये 190, 2016 मध्ये 171, 2017-105, 2018-148 तर 2019 मध्ये 191 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत.









