मुंबई \ ऑनलाईन टीम
देशात अगदी उद्या निवडणूक झाली तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्याचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील जगातील सर्व पार्लमेंटच्या जागा जिंकू शकतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांना यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या देशात अगदी उद्या निवडणूक झाली तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल या वक्तव्याविषयी विचारले. यावर संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजप नेते असतील त्यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला अभिनंदन करू वाटतं. त्यामुळे भाजपला 400 काय अगदी 500 जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील पार्लमेंटसच्या सर्व जागा जिंकू शकतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा कोरोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
यासोबतच संजय राऊत यावेळी तौक्ते वादळाविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत, असे म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








