कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील गणेश वाडी गावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 महिला, 5 पुरुष, व 3 जनावरे जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्याच्या या हल्ल्यामध्ये गेले दोन दिवस सर्व नागरिक हैराण झाले आहेत. जखमींवर ताबडतोब शिरोली येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत व गावातील इतर नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सरपंच दादासो लाड यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. यावेळी आरोग्यसेवक आनंदा बाटे, पोलीस पाटील धनश्री मेढे, व पंढरीनाथ तहसीलदार, तलाठी एन पी पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबिले आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








