पोलिसांची नाकाबंदीही होणार काटेकोर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी रूग्णांची गैरसोय होवू नये यादृष्टीने महिला रूग्णालयाची क्षमता 115 खाटांनी वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरजेनुसार विविध महाविद्यालयेही ताब्यात घेण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात 599 ऍक्टीव्ह रूग्ण आहेत यातील 293 रूग्ण गृह विलगीकरणात तर 300 रूग्ण कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रिक्त परिचारिका पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.
या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रूग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर योग्य संख्येत उपलब्ध आहेत. महिला रूग्णालयात 150 क्षमतेचे आहे. याच रूग्णालयातील दुसऱया इमारतीत अजून 115 खाटा व नगर परिषदेच्या रुग्णालयात 50 खाटा वाढवणार असल्याची उदय सामंत यांनी दिली. प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची व नागरिकांनीही योग्य सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
शासनाचे आदेशाचे काटेकारेपणे पालन केल्यास शासनाकडून दिलासा-उदय सामंत
रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मंत्री उदय सामंत याची भेट घेतली. यावेळी व्यापाऱयांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱयांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा नवीन संकट उभे राहिल्याची भावना व्यापाऱयांनी मंत्री सामंत यांच्यासमोर व्यक्त केली. यावर आपल्या व्यापाऱयांचे म्हणणे मुख्य सचिवांसमोर आणि मंत्रिमंडळ बैठकीत मांडतो. व्यापाऱयांनी येणारे 8 दिवस शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा यामुळे यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढता येईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिले आहे. यावेळी व्यापाऱयांनी सहकार्य करण्याचे मान्य केले.









