कोकण रेल्वेने पार केला महत्वाचा टप्पा
प्रतिनिधी /मडगाव
कोकण रेल्वेच्या संपूर्ण 741 किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पाची एकूण किंमत ा1287 कोटी आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि थिवी दरम्यानच्या शेवटच्या विभागाची सीआरएस तपासणी 24 मार्च 2022 रोजी करण्यात आली आणि त्याला 28 मार्च 2022 रोजी अधिकृतता प्राप्त झाली.
भारतीय रेल्वे ‘मिशन 100 टक्के विद्युतीकरण – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ योजनेअंतर्गत आपल्या लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग प्रदान करण्यासाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याच्या मिशन मोडवर आहे.
रेल्वे विद्युतीकरणाच्या भारतातील सर्वात मोठय़ा पट्टय़ांपैकी एक हरित वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि रेल्वेमंत्री श्री. अश्विनी तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि रेल्वे मंत्रालयातील राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेने रेल मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे.
कोरोनामुळे प्रकल्प बनला आव्हानात्मक
कोविड – 19 महामारीमुळे कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि अनुकूल वातावरण नसल्यामुळे विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक झाला होता. शिवाय कोकणात पावसाळय़ात जोरदार पडणाऱया पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली.
इलेक्ट्रिक ट्रकचे अनेक उपजत फायदे
इलेक्ट्रिक ट्रकचे अनेक उपजत फायदे लक्षात घेणे फायदेशीर आहे, म्हणजे इंधन खर्चात लक्षणीय बचत म्हणजे रु. 150 कोटींहून अधिक बचत, पश्चिम किनारपट्टीवरील अखंड ऑपरेशन, प्रदूषणमुक्त वाहतुकीची पद्धत आणि एचएसडी तेलावरील कमी अवलंबित्व होय.
कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वे नेटवर्कवरील सर्वात मोठय़ा रेल्वे मार्गांपैकी एक असल्याने, नवीन विद्युतीकरण केलेल्या कोकण रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक टेन चालवल्या जातील अशी माहिती कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. कोकण रेल्वे नेहमीच ‘सेफ्टी फर्स्ट’ पाळते आणि यापुढेही देशाच्या प्रगतीसाठी काम करत राहील, असे कोकण रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.









