प्रतिनिधी / कोल्हापूर
गतवर्षी कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांच्या सहकार्याने राबवलेल्या उपक्रमाची राज्याने नोंद घेतली. अन् हे उपक्रम संपूर्ण राज्यात राबवले. आता कोरोनाची दाहकता कमी करण्यासाठी सर्व घटकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, कुटुंब, समाज, जिल्हा सुरक्षिततेसाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिह्यातील सरपंच, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्राम समिती सदस्यांशी जिल्हाधिकारी देसाई यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, करवीर प्रातांधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना प्रतिबंधात गतवर्षी ग्राम समित्यांनी उल्लेखनीय काम केले. आता शेजारच्या जिह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी जागरुक राहून काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या मास्क वापराचे प्रमाण कमी झाले आहे. गावात कोरोना वाढू नये यासाठी ग्राम समित्यांनी मास्क, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्स त्रिसुत्रीचा वापर करण्यासाठी गावात प्रबोधन करावे. त्यासाठी ग्राम समित्यांनी बैठका घेऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या.
लसीकरणात जिल्हा अग्रेसर ठेवा : जिल्हाधिकारी
लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढणार असल्याने 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्तांनी व 60 वर्षावरील ज्येष्ठांनी लसीकरण करुन घ्यावे. जिह्यात 150 केंद्रावर लसीकरणाची सोय केली आहे. ग्राम, प्रभाग समित्यांनी गाव, प्रभागातील लोकांची यादी करुन त्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. या वयोगटातील सरपंच, सेवा सोसायटÎांचे संचालक, मंडळाचे कार्यकर्ते, मान्यवरांनी लसीकरण करुन घ्यावे. या वयोगतील 31 मार्चपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यास जिह्यात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्हा लसीकरणामध्ये अग्रेसर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
मास्क नसलेल्यांवर पोलीस कारवाई : पोलीस अधिक्षक
पोलीस अधीक्षक बलकडे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेणे महत्वाचे आहे. विना मास्क फिरणाऱयांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल. यामागे कोरोनापासून जिल्हा सुरक्षित ठेवणे हा उद्देश आहे. भविष्यात गावात यात्रा, सण, जयंतीमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता ग्राम समिती, ग्रामस्थांनी घ्यावी, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, लोकप्रतिनिधीनी सामाजिक उत्तरदायित्व समजून लसीकरणात सहभाग वाढवावा. लसीकरणाचे नियोजन करुन गावातील लोकांनी नोंदणी करावी. नोंदणी केलेल्यांना केंद्रावर पाठवून त्यांची लसीकरण पूर्ण होईल यासाठी योगदान द्यावे.
आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, प्रभाग समित्यांनी त्यांच्या प्रभागात लसीकरणाचे नियोजन करावे. शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या भागात कंटेन्मेंट झोन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. खासगी हॉस्पिटल्संनी त्यांच्याकडे येणाऱया रुग्णांची माहिती प्रशासनास द्यावी.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जिह्यातील कोरोनाची माहिती दिली. तसेच यापुढे प्राथमिक आरोग्य केंद, म.न.पा. दवाखाने, जिल्हा परिषदेकडील आरोग्य केंद्रावर सोमवार ते शनिवार लसीकरण केले जाईल. तसेच लसीकरणासाठी केंद्री जादा वेळे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे म्हणाले.
Previous Articleरत्नागिरी : अखेर ‘त्या’ अनधिकृत बांधकामांवर फिरू लागला बुलडोझर
Next Article तोतया ‘रॉ’ अधिकाऱयाला अटक









