म्हैसूर / प्रतिनिधी
देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र आणि राज्य सरकार पूर्णतःअपयशी ठरले आहे. अशी टीका माजी मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.एच.सी. महादेवप्पा यांनी केली आहे. तसेच लॉकडाऊनचा प्रत्येक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.त्यामुळे सर्वत्र मंडी असल्याचेही ते म्हणाले . लॉकडाऊननंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी काय निर्णय घ्यायचे हे केंद्र व राज्य सरकारला कळत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती अनियंत्रित होत चालली आहे.
यावेळी महादेवप्पा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही सरकारवर निशाणा साधला. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या बदल्यात राज्य सरकारने भू-सुधारणा दुरुस्ती कायदा आणून शेती व शेतकरी अधिक वाईट दिसू आणण्याचा संकल्प केला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते देवराज यांच्या कार्यकाळात, भूमिहीनांना जमीन देण्याचा नारा देण्यात आला होता, तेथे भाजप सरकारने आता श्रीमंत भांडवलदारांना जमिनी देण्याचा नारा दिला आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी एक अध्यादेश काढला जात आहे आणि भू-सुधारणा सुधारित कायदा आणला जात आहे, असे ते म्हणले. या सुधारित कायद्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस राज्यव्यापी मोहीम उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









