प्रतिनिधी / कोल्हापूर
यंदा जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे जिह्यात झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय अंतर मंत्रालयाचे पथक प्रमुख रेवनीशकुमार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून घेतली. नुकसानग्रस्तांना `एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत मिळेल, ^असे रेवनीशकुमार यांनी मंगळवारी सांगितले. तर या निकषानुसार मिळणारी मदत कमी असल्याने हे निकष बदलण्याची शिफारस पथकाने करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली.
जिह्यातील पूर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खासदार धैर्यशील माने, पथक सदस्य नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, प्रताप जाधव यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदींसह वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिह्यात महापुराने झालेल्या नुकसानीची माहिती पथकासमोर सादर केली. जिह्याचे सरासरी पर्जन्यमान 1772 मिलिमीटर इतके असून यावर्षी आज पर्यंत 1064 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. 22 ते 25 जुलै या कालावधीत जिह्यात मोठÎा प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने महापुर आला. यामुळे जिह्यातील 409 गावे व त्यातील 72 हजार 411 कुटुंबे बाधित झालेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
पुरामुळे बाधित झालेल्या 409 गावातील घरांचे व जनावरांच्या गोठÎांचे नुकसान मोठÎा प्रमाणावर झाले असून यासाठी किमान 18 कोटी 72 लाख रुपयांची, हँडीक्राफ्ट, हॅण्डलूम यांच्यासाठी एक कोटी 30 लाख रुपये, छोटे दुकानदार व व्यवसायिक यांच्यासाठी 53 कोटी 95 लाख रुपये, मत्स्य व्यावसायिकांसाठी 6 कोटी 44 लाख रुपयांची, पिकांच्या नुकसानीसाठी जवळपास 94 कोटी 52 लाख रुपये, कृषी योग्य जमिनीच्या नुकसानीसाठी 4 कोटी 13 लाख रुपये, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत बांधकाम, वीजवितरण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व कृषी विभागांच्या मालमत्तांच्या नुकसानीसाठी 226 कोटी 48 लाख रुपयांची आवश्यकता आहे, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
मदत व पुनर्वसनासाठी एक राष्ट्रीय धोरण असावे : खा. धैर्यशील माने
अतिवृष्टी व महापुरामुळे जिह्यातील शेतकयांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती खा. माने यांनी केंद्रीय पथकाला दिली. `एनडीआरएफ’ नुसार मिळणारी मदत ही खूप कमी आहे. ही मदत झालेल्या नुकसानीप्रमाणे मिळावी, यासाठी निकषामध्ये बदल करण्याची शिफारस केंद्रीय पथकाने करावी, तसेच मदतीसाठी व पुनर्वसनासाठी एक राष्ट्रीय धोरण असावे, अशी मागणी त्यांनी केली.
54 लाख 56 हजार रुपयांची गरज : जिल्हाधिकारी
पूरपरिस्थितीत 2, चंदगड 2, कागल 1 व भुदरगड 1 असे 6 मृत्यू झालेले असून प्रत्येकी चार लाख याप्रमाणे 24 लाख रुपये तसेच दुधाळ जनावरे 81, लहान जनावरे 37 व 1874 पोल्ट्री बर्डस यासाठी 30 लाख 56 हजाराची गरज आहे, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
सहा तालुक्यातील रस्त्यांचे मोठÎा प्रमाणात नुकसान : जिल्हाधिकारी
जिह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्त्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठÎा प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच जिह्यातील अनेक गावांमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.









