नियती होणार का नियंत्रित?
असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरीही. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सिरीज ‘समांतर’ आपला सिझन 2 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. समांतर 2 हा 1 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यात पुन्हा एकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’ सिझन 2 विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर’चा ट्रेलर ही प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसऱयाचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे. सिझन 1 चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱया काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सिझन 2 मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्राr कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही या गूढ स्त्राrचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्राr कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध 10 भागांच्या थ्रिलरमध्ये आहे. सिझन 2 बद्दल स्वप्नील जोशी म्हणतो, ’प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन ‘समांतर’ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शो ने आपलंस केलंय.’’ ‘समांतर’चा पहिला सिझन येऊन वर्ष उलटले असून प्रेक्षक सिझन 2 ची वाट पाहात आहेत.









