नवी दिल्ली : मलेशियातील हवाई वाहतुक कंपनी एअर एशिया ग्रुप बीएचडी यांनी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ कंपनी भारतातील व्यवसायाचा गाशा गुंडाळणार आहे. भारतात सध्या संयुक्त भागीदारीतून विमान सेवा सुरू ठेवण्याबाबत कंपनी चाचपणी करत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जपानसह भारतातही कंपनी मोठय़ा नुकसानीला सामोरी जात आहे. त्यामुळे कंपनीचा आर्थिक बोजा अधिक वाढला आहे. मागच्या महिन्यात कंपनीने जपानमधील आपला व्यवसाय बंद केला आहे. कंपनीचा एअरएशिया इंडियामध्ये 49 टक्के इतका वाटा आहे.
Previous Articleमेट्रो शहरात भरतीचे प्रमाण वाढले
Next Article बीपीसीएलच्या खरेदीसाठी अनेकांची बोली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









