पुणे / प्रतिनिधी
लातूरमधील उदगीर येथे होणाऱया 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची रविवारी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. येत्या 22 ते 24 एप्रिलदरम्यान हे संमेलन होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
लातूर जिह्यातील उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महायिद्यालयात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीला साहित्य महामंडळाचे कार्यवाहक डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रा मिलिंद जोशी, विलास मानेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा मसापचे शाखा अध्यक्ष श्री तिरुके, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, प्राचार्य आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य प्रा. डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.
उदगीर येथे होणाऱया 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार, याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी सासणे यांच्यासह ज्ये÷ साहित्यिक अनिल अवचट, डॉ. रामचंद्र देखणे, प्रवीण दवणे, अच्य़ुत गोडबोले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सासणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत साहित्य संमेलनाच्या कोरोना काळातील आयोजनाबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.
मराठीतील महत्त्वाचे कथालेखक
भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी. एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारी पदांवर त्यांनी नोकरी केली. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्टय़े आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली.
बहुपदरी कथा
सासणे यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्टय़पूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱया त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.
अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ
काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱया मराठवाडय़ातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फँटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱया व मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱया कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
सासणे यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रति÷sचे पुरस्कार लाभले आहेत. भारत सासणे यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘काळोखाच्या पारंब्या’या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेमध्ये स्वतःही ते काम करत आहेत.
भारत सासणे यांची ग्रंथसंपदा ः
अदृष्ट (दीर्घकथा संग्रह), अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह), अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह), आतंक (दोन अंकी नाटक), आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह), ऐसा दुस्तर संसार, चिरदाह, त्वचा (दीर्घकथा संग्रह), चल रे भोपळय़ा/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका), जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी), जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह), दाट काळा पाऊस (दीर्घकथा), दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका) दोन मित्र (कादंबरी), नैनं दहति पावकः, बंद दरवाजा (कथासंग्रह), मरणरंग (तीन अंकी नाटक), राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी), लाल फुलांचे झाड (कथासंग्रह), वाटा आणि मुक्काम (सहलेखक-आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया), विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह), शुभ वर्तमान (कथासंग्रह), सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह), स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह), क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह).








