नीतेश राणे यांचे मतः वैभववाडी तालुक्यातील गावांना गोळय़ांचे वाटप
प्रतिनिधी / वैभववाडी:
संकटात लढण्यासाठी येथील जनतेला सुरक्षा कवच देण्याचा आपला प्रयत्न आहे. कोरोना व्हायरसबरोबरच पावसाळय़ात साथीचे आजार डोकं वर काढण्याची शक्मयता आहे. या सर्व आजाराविरोधात लढताना प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या गोळय़ा उपयुक्त आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केरळसारख्या राज्यात या गोळय़ा फायदेशीर ठरल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम जाणवले आहेत. आर्सेनिक अल्बम-30 गोळय़ा वितरीत करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.
आमदार राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुक्मयात आर्सेनिक अल्बम 30 या गोळय़ा उपलब्ध झाल्या आहेत. या गोळय़ांचे वाटप एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात आमदार राणे यांच्या हस्ते झाले. राणे यांनी या गोळय़ा प्रत्येक गावच्या सरपंचांकडे सुपुर्द केल्या आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, डॉ. उमेश पाटील, डॉ. गोखले व कार्यकर्ते उपस्थित होते. संकटात लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 हे एक भक्कम सुरक्षा कवच आहे. म्हणून प्रत्येक नागरिकापर्यंत गोळय़ांचा डोस पोहोचविणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार गोळय़ांचे वाटप सुरू आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार या गोळय़ांचा डोस सेवन करा व आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करा, असे आवाहन राणे यांनी केले.
गोळय़ांच्या वाटपात दुजाभाव नाही
गोळय़ांचे वाटप करताना आम्ही कोणताही दुजाभाव करणार नाही. याप्रसंगी कोणावरही टीका-टिपणी करणार नाही. सर्वांना गोळय़ा घरपोच होणार आहेत. त्याबाबत कोणीही काळजी करू नये. गोळय़ा घरपोच झाल्यानंतर आमची वैद्यकीय टीम संबंधित कुटुंब मालकाचे नाव, सही व मोबाईल नंबर घेणार आहेत. पुढील डोस देताना डॉक्टरांकडे त्या गावातील नागरिकांची माहिती असावी, यासाठी त्यांची नोंदणी केली जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
कोरोना संकटात सरपंच भरडला
कोरोना संकटात प्रत्येक गावचा सरपंच भरडला जात आहे. राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर सरपंचांवर फोडले जात आहे. सरपंचांवर होणाऱया अन्यायाविरोधात सर्व सरपंचांनी एकत्रित येऊन राज्य शासनाच्या विरोधात भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंचांकडून डोंगराएवढय़ा अपेक्षा
मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांची अगोदर यादी सरपंचांकडे आली असती, तर योग्य नियोजन करणे त्यांना शक्मय झाले असते. क्वारंटाईनची जबाबदारी सरपंचांवर, पण त्यांना कोणताही निधी नाही. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. मात्र सरपंचांकडे डोंगराएवढय़ा अपेक्षा शासन ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीमेवरच्या चाकरमान्यांना घरी सोडा
सरकारच्या धोरणाविरोधात भूमिका सरपंचांनी आता घेतलीच पाहिजे. सरपंच जर गप्प राहणार असतील, तर भविष्यात सरपंचांच्या घरावर मोर्चे येणार हे निश्चित आहे. ई-पासचे कोणतेही नियोजन शासनाकडे नाही. मात्र जिह्याच्या सीमेवर आलेल्या चाकरमान्यांना परत हुसकावून लावण्याचे नियोजन यांच्याकडे आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. सीमेवर आलेल्या चाकरमान्यांना आपल्या घरी सोडलेच पाहिजे, असे राणे यांनी सुनावले.
सरपंचांनी अन्यायाविरुद्ध भूमिका घेणे गरजेचे
या संकटात सरपंचांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. मी सगळी ताकद उभी करीन. मात्र अन्यायविरोधात आता भूमिका घेणे गरजेचे असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी भालचंद्र साठे, डॉ. गोखले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, भाजप पदाधिकारी, गाव अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.









