बेंगळूर : विजेचा धक्का बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बेंगळूर शहराबाहेरील आनेकल तालुक्याच्या अत्तीबेले येथे गुरुवारी घडली. आकाश (वय 30), महादेव (वय 35), विषकंठ (वय 35) आणि विजयसिंग (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, गृहप्रवेशाचा कार्यक्रम असल्याने मृत चौघेजण घराला लायटींग करत होते. दरम्यान, खांबावरून विद्युत घेत असताना चौघानांही विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अत्तीबेले पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची नोंद अत्तीबेले पोलिसात झाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleआपण कोणाविरुद्धही तक्रार केलेली नाही : ईश्वरप्पा
Next Article बुधवारी राज्यात तब्बल 6,976 पॉझिटिव्ह रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









