भारतात येणाऱया-जाणाऱया सर्व प्रवासी विमानांवर निर्बंध ः कार्गो सेवा मात्र सुरू
@नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण अद्यापही ‘जैसे थे’ पातळीवर आहे. तसेच तिसऱया लाटेचा धोका अनेक देशांमध्ये वाढल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. तसेच कोणतेही विमान भारतात येणार नाही. मात्र, कार्गो विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने याबाबत नुकतेच निर्देश जारी केले आहेत.
डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने अमेरिकेसह काही युरोपीय देशांनी बाहेरून येणाऱया विमानांवर बंदी घातली आहे. साहजिकच आता भारतानेही आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता, गेल्यावषी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतुकीवर प्रतिबंद आले होते. त्यानंतर काही अटी शर्थीवर विमान प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी विमान प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.









