प्रतिनिधी / सांगली :
अलमट्टी धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी 10.30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोयातील आणि कर्नाटकच्या कृष्णा खोयातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसे नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचे काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.








