राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आवाहन : 2019 च्या अनुभवानंतर खबरदारी आवश्यक
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यात 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या काळात जिह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
क्षीरसागर म्हणाले, 2019 च्या भयानक महापुराची भीषणता कोल्हापूरवासीयांनी अनुभवली आहे. त्या आठवणी आजही ताज्या असताना जिह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खासकरून कोल्हापूर जिह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड तालुक्यातील नागरिकांनी जादा सतर्क राहण्याची गरज आहे. अंदाजित पाऊसमानानुसार नदी व नाल्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शहरातील पूर बाधित क्षेत्रासह जिह्यातील नदी काठावरील गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. संभाव्य पूरस्थितीची जाणीव झाल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. या अतिवृष्टीच्या काळात जिह्यातील नागरिकांनी संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्राsतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, मोबाईलचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण रहात असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱया सूचनांचे पालन करावे. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करू नये, असेही आवाहनही क्षीरसागर यांनी केले आहे.









