प्रतिनिधी /बेळगाव :
काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर कितने वीर’ या नावाने पुस्तके वाटण्यात आली. त्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात खोटारडे लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेस स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी अत्यंत हीन पातळी गाठत आहे. ज्याने पुस्तक लिहिले आहे त्या प्रकाशकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृतीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
काँग्रेसने जी पुस्तके वाटली आहेत त्यामुळे धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होण्याची शक्मयता आहे. काँग्रेसची शिबिरे म्हणजे देशातील सामाजिक सलोखा बिघडविण्याची प्रशिक्षण केंद्रे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या देशातील क्रांतिकारक म्हणजे मशिदीवर दगडफेक करणारे आणि अल्पसंख्याकांच्या महिलांवर अन्याय करणारे असे दाखविण्यात आले आहे. सावरकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
‘त्या’ पुस्तकावर बंदी घालावी तसेच त्याच्या प्रकाशकावर कारवाई करावी. अन्यथा, सामाजिक शांतता बिघडल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार असेल, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला आहे. शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, ऋषिकेश गुर्जर, सदानंद मासेकर, गोपाळ हलगेकर, अर्चना किमये, मिलन पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









