प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बुधवार सायंकाळपासूनच्या २४ तासांत १०२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतचे एकाच दिवशी सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याचबरोबर ५ जणांचा मृत्यूही झाला आहे. नव्या रुंगणामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४३८ झाली आहे. तर कोरोना मृतांची संख्या ४९ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय – २४, उपजिल्हा रुग्णालय कामथे – ४८, दापोली – २, घरडा, खेड – २७, लांजा – १.
राजापूर येथील एका ६५ वर्षीय करोनाबाधिताचा, तसेच रत्नागिरीतील ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. खेड येथे दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यांचे वय अनुक्रमे ७१ आणि ४० वर्षे आहे. चिपळूण येथे ४९ वर्षीय करोना रुग्णाचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी – ९, खेड – ६, गुहागर – २, दापोली – ११, चिपळूण – ९, संगमेश्वर – ६, लांजा – २, राजापूर – ३, मंडणगड – १. 45 जण कोरोनामुक्त
४५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८५८ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील ६, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली येथील ३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन येथील २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड येथील २१, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, गुहागर येथील ३ आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील १० जणांचा समावेश आहे. आजच्या एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३१ आहे.
Previous Articleपुण्यात उद्यापासून लॉक डाऊन नाही; पण निर्बंध कायम
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे 9 बळी, 146 नवे रुग्ण








