खानापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवनाची वाटचाल करून क्रांती घडवली. त्यांचा जीवनाचा आदर्श प्रत्येक युवकांनी घेतला पाहिजे. यासाठीच ‘झी’ वाहिनीवर महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामालिका सुरू आहे. ती प्रत्येक युवकांनी न विसरता पहावी, असे आवाहन भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी महानायक जागृती फलकाचे अनावरण करताना काढले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गांधीनगर-हलकर्णी शाखेच्यावतीने खानापूर-जांबोटी क्रॉसवरील संत बसवेश्वर चौकात सदर फलक बसवण्यात आला आहे. प्रारंभी ऍड. आकाश अथणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक केले. तसेच फलक अनावरणाचा उद्देश विशद केला. यावेळी बजरंग दल तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, दशरथ बनोशी, ता. पं. माजी उपसभापती सुरेश देसाई व इतरांची भाषणे झाली. यावेळी मल्लेश पोळ, सागर अष्टेकर, किरण अष्टेकर, आनंद बेळगावकर, मंगल गोसावी व तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच गांधीनगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleपरमहंस गुप्तानंद महाराज यांची 69 वी पुण्यतिथी
Next Article खड्डय़ांतील पाण्यामुळे वाहनधारकांची कसरत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









