राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची महापालिका प्रशासनास सूचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेलजवळील प्रमुख प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेवून तातडीने सुशोभिकरण करण्यात यावे, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास सोमवारी केली. सुशोभिकरणानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज' असे या नामकरण करूनकरवीरनगरीमध्ये सहर्ष स्वागत अशा’ आशयाचा फलक कमानीवर लावण्यात यावा, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना क्षीरसागर यांनी या संदर्भात सविस्तर पत्र पाठवून सुचना केल्या आहेत. या संदर्भात क्षीरसागर यांनी म्हटले आहे : कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेली कमान कोल्हापूरकरांची अस्मिता आहे. हे प्रवेशद्वार गेली अनेक वर्षे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अशातच या प्रवेशद्वारावर उद्योजकांच्या जाहिरातीचे फलक झळकविल्याने कोल्हापूर शहरवासियांमध्ये नाराजी होती.
शिवसेनेने तत्काळ याची दखल घेवून या प्रवेशद्वारावर रयतेचे राजे `राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ यांच्या नावाचा फलक फडविला होता. त्यावेळी प्रवेशव्दाराचे विद्रुपीकरण करू नये अशा सूचनाही महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. आता प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेवून तातडीने सुशोभिकरण व नामकरण करावे, अशी सूचना लेखी पत्रव्दारे क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास केली आहे.









